Ad will apear here
Next
‘रासायनिक अभियांत्रिकीमुळे दैनंदिन जीवन सुकर’
पुणे : ‘आयुर्वेदिक उत्पादने, खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने यामध्ये रासायनिक अभियांत्रिकीचा मोठा वापर केला जातो. तसेच वैद्यकीय क्षेत्रात तात्काळ आराम देणाऱ्या वेदनारहित औषधांमध्येही प्रभावी रसायने वापरली जातात. त्यामुळे मानवाचे दैनंदिन जीवन अधिक सुकर होत आहे,’ असे मत एमआयटी विश्वशांती विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. रत्नदीप जोशी यांनी व्यक्त केले.

मराठी विज्ञान परिषद (मविप), पुणे विभाग, मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र व महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैज्ञानिक कट्ट्यावर ‘दैनिंदिन जीवनात रासायनिक अभियांत्रिकीचा वापर’ या विषयावर डॉ. जोशी बोलत होते.

या प्रसंगी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. विनय र. र., सहकार्यवाह संजय मालती कमलाकर, प्रा. राजेंद्र सराफ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सेनापती बापट रस्त्यावरील मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्राच्या सभागृहात हा वैज्ञानिक कट्टा भरला होता.

डॉ. जोशी म्हणाले, ‘या क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून, येत्या काळात रसायन अभियांत्रिकीमुळे क्रांती घडणार आहे. नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. या तंत्राच्या साहाय्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावरील कंपन्यांवर आपण नियंत्रण ठेवू शकतो. दैनंदिन जीवनामध्ये आपण सतत रसायनयुक्त वस्तूंचा वापर करत असतो. मोबाईल, खेळाचे साहित्य यामध्ये रासायनिक घटकांचा वापर केला जातो. निसर्गाला हानिकारक होणार नाही, अशा पद्धतीने रसायनाचा नियंत्रित वापर केला, तर त्याचा अधिक उपयोग मानवी जीवन उंचावण्यासाठी होऊ शकतो.’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र सराफ यांनी केले, प्रा. विनय र. र. यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZOQBL
Similar Posts
वैज्ञानिक कट्ट्यावर डॉ. रत्नदीप जोशी पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग (मविप), मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र व महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने २४ फेब्रुवारी २०१८ रोजी वैज्ञानिक कट्ट्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. डॉ. रत्नदीप जोशी या कट्ट्यावर येणार असून, ‘दैनंदिन जीवनात रासायनिक अभियांत्रिकीचा वापर’ या विषयावर ते संवाद साधणार आहेत
‘कचरा व्यवस्थापन महत्त्वाचे’ पुणे : आपण जसे क्षमतेपलीकडे काम करू शकत नाही, तसेच निसर्गाचेही आहे. त्यामुळे निसर्ग संवर्धनावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. दुसऱ्यावर अवलंबून न राहता पुढ्च्या पिढीला निरोगी भविष्य देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायला हवा.
‘कष्टाऐवजी बुद्धीच्या कामांना प्राधान्य’ पुणे : ​‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापराने आज अनेक उपकरणे विकसित होत आहेत. आरोग्याची काळजी घेणारी ही उपकरणे भविष्यात माणसाचे आयुर्मान वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अवघड आणि अशक्य कामे रोबोटकडून होऊ लागले आहेत. त्यामुळे माणसाला यापुढे कष्टाची नाही, तर बुद्धीची कामे करण्याला प्राधान्य
‘सजीवांच्या अभ्यासात जैवमाहितीशास्त्र महत्त्वपूर्ण’ पुणे : ‘सजीवांमध्ये मोठ्या प्रमाणात माहिती भरलेली आहे. स्थायी, द्रव स्वरूपात शरीराची रचना असून, त्यात ६५ टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन आहे. विविध पेशी, बॅक्टेरिया आणि जैविक घटक शरीरामध्ये आहेत. सजीवांच्या या अभ्यासासाठी जैवमाहितीशास्त्र अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे,’ असे मत सावित्रीबाई फुले पुणे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language